TOD Marathi

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थमंत्री म्हणून आपला चौथा २०२२ चा अर्थसंकल्प सादर केला. २०२२ अर्थसंकल्पात २०४७ पर्यंतची रुपरेषा असल्याचे सांगत ‘पीएम गतिशक्ती योजने’च्या ‘मास्टर प्लान’वर सरकार काम करत असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
अर्थमंत्र्यांनी देशातील पायाभूत सुविधांसाठी यावेळी मोठ्या घोषणा केल्या आहेत . गतिशक्ती योजनेअंतर्गत रस्ते, रेल्वे, जलवाहतुकीसाठी येत्या काळात मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासात राज्य सरकारांनी देखील पुढाकार घेऊन सहभाग होणे आवश्यक असल्याचीही सीतारामन म्हणाल्या. अर्थव्यवस्थेचा सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होत असतो. त्यामुळेच, यंदाच्या बजेटमध्ये सर्वसामान्यांना काय मिळाले, काय स्वस्त झाले आणि काय महागले याची चर्चा होत असते. त्यामुळे,

यंदाच्या बजेटमध्ये काय स्वस्त झाले, काय महाग झाले हे खालीलप्रमाणे –

स्वस्त –
कपडे, चामड्याचा वस्तू
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू
मोबाईल फोन, चार्जर
हिऱ्याच्या वस्तू, दागिने
शेतीची अवजारे
कॅमेरा लेन्सेस स्वस्त होणार
विदेशातून येणाऱ्या मशिन्स
चप्पल आणि बुट्स
इंधन स्वस्त होण्याची शक्यता
इम्पोर्टेड केमिकल स्वस्त होणार

महाग –
छत्र्या महाग होणार
क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक महाग.